स्पर्धा परीक्षा,स्वप्न, संघर्ष आणि यश - प्रत्येक विद्यार्थ्याची खरी कहाणी
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थी संघर्षमय आयुष्य एक कथा
" विद्यार्थी जीवन म्हणजे खूप सोप्पं असतं - हे वाक्य फक्तं दुरून बागणाऱ्याला वाटते, पण ज्यांनी त्या वाटा तुडून पुढे गेले त्यांना माहीत आहे, हा प्रवास किती काट्याने भरलेला आहे
* ही गोष्ट आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याची जो स्वप्नं बगतो - मोठं होण्याचं, आई बापाचं नाव उंचावणे, समाजात स्वतःचं स्थान मिळवणं त्या साठी करावा लागणारा संघर्ष कुणाला दिसत नाही,
* सकाळी उठण आणि संघर्ष सुरू होणं
पहाटे 5 वाजता उठण, डोळे झोपलेले असतांना, नोट्स चाळणे,
मित्र कुठे तरी फिरायला जातात पण विद्यार्थी पुस्तकात डोळे पाहून बसतो,
कारण त्याला माहीत असते, हा आजचा त्याग उद्याचा यश ठरवतो,
* इतर लोकांना वाटते हा फक्त अभ्यास तर करतो ,पण त्या मागे काय काय असते?
अस्त ते आपेक्षा च ओझं -
* आई - बापाचं, भावाचा, स्वतःचं
* शिकवण फि साठी घरचे घेतात कर्ज , आणि विद्यार्थी त्याचं तळ मनात मांडतो
* परीक्षा जवळ आली की रात्री झोप लागत नाही, टेन्शन, घाबरट पणा,आत्मविश्वास डळमळीत होतो,
* अस अस्तानी सुध्दा स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी पुन्हा अभ्यासाला बसतो, यालाच म्हणतात टिकणारा प्रयत्न
अपयश ही एक कठीण परीक्षा आहे
* कधी कधी प्रचंड मेहनती नंतर मार्क्स कमी मिळतात, कधी एखादी पोस्ट हुकते, आणि वाटते कदापि आपला काही होणार नाही
* डोळ्यात पाणी येते, पण त्याचं डोळ्यांनी पुन्हा पुस्तक उघडून धैर्य गोळा करून अभ्यासाला बसावं लागतं, कारण मनातून एक आवाज येतो तू आणखी हरला नाहीस, उठ आणि लढ
* आई बापाचं स्वप्नं हेचं तर खर त्याचं बळ असतं, गरीब घर , जुना मोबाईल, तुटलेला टेबल, पंखा नाही तरी अभ्यास सुरू असतो
* गरीब परिस्तिथी अडथळा नाही , तर ती प्रेरणा असते
* यश केवळ बुद्धी मत्तेवर नाही तर चिकाटी वर आहे
motivationalaai.blogspot.com
– प्रत्येक विद्यार्थ्याच्या संघर्षाला सलाम!

Comments